६८. समज


तू जे विसरायचं सांगतोस
तेच हमखास आठवतं
माझ्या ओठांना बोटांना
जे लक्षात ठेव म्हणतोस
ते तर असतंच माझ्या
पोटात

सापडलेलं प्रेम
परत पाठवून द्यायचं
तर पत्रं हरवतात

पाठीवरचे पंख
भुरूभुरू पीठ होऊन गळू लागले की
कणा संकटात आलाय समजतं.

“}” href=”https://www.facebook.com/kavita.mahajan.5/posts/2816203900029?comment_id=2396073&notif_t=feed_comment#” id=”.reactRoot[152]” title=”Like this item”>

Leave a comment